Friday, June 22, 2012

Abraham Lincoln's inspriational life story


A success story, must read:


At the age of 7, a young boy and his family were forced out their home. The boy had to work to support his family.
At the age of 9, his mother passed away. When he grew up, the young man was keen to go to law college, but had no education.
At 22, he lost his job as a store clerk.
At 23, he ran for state lagislature and lost. The same year, he went into business. It failed, leaving him with a debt that took him 17 years to repay.
At 27, he had a nervous breakdown. 
At 29, he tried for the post of speaker in his state legislature. He lost.
At 31, he was had been defeated twice while running for Congress. Finally, he did manage to secure a brief term in Congress, but at 39 he lost his reelection bid.
At 41, his four-year-old son died.
At 42, he was rejected as a prospective land officer.
At 45, he ran for senate and lost. Two years leter, he lost the vice presidential nomination.
At 49, he ran for senate and lost again.
At 51, he was elected the president of the United States of America and he won!

The man in question is Hon. Mr. Abraham Lincoln.

For more information: http://en.wikipedia.org/wiki/Abraham_Lincoln

Wednesday, April 4, 2012

ऐकायला शिका.....


‘‘आपल्या आयुष्याची गाडी नेहमीच सरळ चालेल असं नाही. ती निरनिराळी स्टेशन्स घेत, अनुभव घेत पुढे जाते. कधीतरी कुठेतरी तिचा अपघातही होतो. नात्यांचंही असंच असतं. टप्याटप्यानं ते विकसित होतं. नात्याचा पाया बळकट करण्यासाठी नात्यांवर विशेष मेहनत घ्यावी लागते. वेळ द्यावा लागतो. नात्यांमध्ये वाद झाला तर एकमेकांचे नीट ऐकण्याइतपत मोकळेपणा आपल्याजवळ असायला पाहिजे. तसं झालं नाही तर शब्दानं शब्द वाढत जातो. मग भांडणं, आरोप करणं, खुलासे मागणं, एकमेकांवर टीका करणं या सगळ्या गोष्टी सुरू होतात. तसं आपल्या नात्याचं होऊ द्यायचं नसेल तर दुसरा जे काही सांगतोय, ते पटत नसलं तरी शांतपणे ऐकून घेऊन मग त्यावर प्रतिक्रिया देण्याचा समजूतदारपणा दाखवायलाच हवा.’’
- मयूर देशमुख
परभणी, महाराष्ट्र

Wednesday, November 9, 2011

The Deshmukh



Deshmukh the tenth handful. In Marathi Desh means a country and Mookh means mouth, hence a spokesman of a district. It was the title given to a person who was granted a territory of land, in certain regions of India, specifically Maharashtra, Andhra Pradesh and Telangana. The granted territory is usually referred to as the Deshmukhi. The Deshmukh was in effect the ruler of the territory, as he was entitled to the collected taxes. It was also his duty to maintain the basic services in the territory, such as police and judicial duties. It was typically a hereditary system. The title of Deshmukh provided the titled family with revenues from the area and the responsibility to keep the order. For this reason, Deshmukh is loosely translated as 'patriot' and the name still commands respect today. The title is most equivalent of a duke or a count within the European aristocratic system.

The Deshmukh system was mostly abolished after the Independence of India in 1947 when the government confiscated most of the land of the Deshmukh's. Some families however maintain their status as real estate barons, most notably in Mumbai, with holdover properties that were not taken away.


It was similar in many respects to the zamindar and jagir systems in India, and can be considered as a feudal system. Typically taxes collected were to be distributed fairly and occasionally deshmukhs participated in Vedic rituals in which they redistributed all material possessions to the people. However, title Deshmukh should not be misundertood for having any relation or for being associated to a particular religion.Ex. Deshmukhis were given by Nizams or Maratha Kings(Chhatrapatis) to Marathas as well as Bhrahmins, Muslims and Jains.

- Mayur Deshmukh (Parbhani)

Monday, July 25, 2011

सरकार , राजकारण आणि आपण!


म्हणे सरकार तर नालायकच आहे!
पण, आपल्या पैकी किती जण प्रत्यक्ष राजकारणात किंवा समाजकारणात उतरून परिस्थिती बदलणार आहोत? हा कळीचा प्रश्न आहे. निव्वळ चर्चेवर चर्चा. दर रोज येन केन प्रकारे फक्त सरकारला शिव्या घालून काय सध्या होणार आहे? आपण राजकारण करत नाही तर ते करत आहेत. मग, जर आपल्यालाला राजकारणात उतरायचे नसेल तर आपण नुसते बोलून काही व्हायचे नाही.
अण्णा हजारे यांनी आंदोलन छेडल्यावर मेणबत्ती मोर्चा मध्ये हजारो जण सामील कारण, त्यात 'स्टेटस' आहे. फेसबुक 'इवेंट' मध्ये ४०००० वर उपस्थिती. पण, अण्णांनी 'जेल भरो' ची हाक दिली आणि सर्व चिडी चूप. 'इवेंट' मध्ये इन मीन ५० लोकांची पसंती!!! तेव्हा देश प्रेम एकाएकी विरून जाते. सर्व कामात 'बिझी' झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी, महात्मा गांधीजींनी अशी भाषणबाजी केली नाही. त्यांनी कृती केली. नाहीतर हिंदुस्तानी जनता आजही जुलमी पारतंत्र्यात खितपत पडली असती. ते स्वतःच्या कर्तुत्वाने इतरांना पण प्रेरणा देते झाले आणि शून्यातून विश्व निर्माण केले. म्हणूनच, ते युग पुरुष ठरलेत. निव्वळ, चार ओळीत सरकारला शिव्या घालायच्या, स्वतः कृतीने काही करायचे नाही. फेसबुकवर मिळालेल्या १०-२० 'लाईक' की धन्यता मानायची. याने काही घडणार नाही! जर, खरच बदल घडवायचा असेल तर तो स्वतः पासून सुरु करावा लागेल. कृतीने करावा लागेल. नाहीतर काळाच्या ओघात हि फक्त कावळ्यांची वरात किंवा कोल्हेकुई ठरेल. सिंह प्रमाणे कोणी डरकाळी फोडायला तयार आहे का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आणि तो सोडवणे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे.

- मयूर देशमुख (परभणी, महाराष्ट्र)  

Friday, May 20, 2011

नीडर तो लीडर . . .


सत्य साईबाबांच्या जाण्यामुळे आता त्यांचा वारस कोण याकडे सगळ्या भक्तांचे लक्ष लागले आहे. आता आम्हाला मार्ग कोण दाखवणार असा प्रश्‍न भक्तांना पडला आहे. दुसरीकडे उद्योगजगतामध्ये रतन टाटांनीसुद्धा आपला वारस शोधण्यासाठी समिती नेमली आहे. राजकारणातही एका पर्वाचा अस्त झाला की अनुयायांना नेत्याचा नवा चेहरा कोण असेल याबाबत उत्सुकता असते. कोणत्याही समुदायाला नेत्याची गरज असते हे वास्तव आहे. पण खरोखरच स्वत:चा, कंपनीचा, देशाचा विकास घडवण्यासाठी नेत्याची गरज आहे का?
सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात आतापर्यंत ज्या नेत्यांनी जनसमुदायाला मार्ग दाखवला त्यांचे योगदान समाजाच्या जडणघडणीत नक्कीच आहे. पण या नेत्यांच्या जाण्यानंतर त्यांचे विचार त्यांच्यासोबत जातात. किंवा ते विचार पुढे अनुयायांनी नेले तरी काळाच्या कसोटीवर ते लागू होतीलच असे नाही. पुढे नवा नेता आला की त्याचे विचार वेगळे आणि त्याची कार्यपद्धती वेगळी. तरीही आपण पुढच्या नेतृत्चाच्या प्रतिक्षेत असतो. परंतु, आधुनिक काळाची गरज अशी आहे की आपण कायम एखाद्या नेत्याच्या प्रतिक्षेत राहण्याऐवजी प्रत्येकाने आपल्या अंगी नेतृत्वगुण जोपासले पाहिजेत.
- एखाद्या कंपनीमध्ये एखादा प्रमुख काही चांगल्या व्यवस्था राबवतो. या व्यवस्था कर्मचार्‍यांच्या फायद्याच्या आणि सोयीच्या असल्या की तो लीडर गेल्यानंतरही ती व्यवस्था तशीच सुरू राहते, पुढचा लीडर कोणी असो वा नसो. अशा ठिकाणी लीडर हा फक्त नावापुरता असतो.
- एखादी कंपनी, एखादा समुदाय नव्या लीडरच्या शोधात असते आणि लीडर अभावी सारे संपले आहे, अशी भावना त्यांच्यात निर्माण होत असेल तर त्या समुदायामध्ये नेतृत्वगुणाचा अभाव आहे.
- बिझनेस मॅनेजमेंटमधून आजकाल प्रत्येक व्यक्तिमधल्या नेतृत्वगुणाला झळाळी आणण्याचा प्रयत्न केला जातो. आधुनिक काळाची ही गरज आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्यातला नेतृत्वगुण वाढवण्याची गरज आहे.
- प्रथम स्वत:चे नेतृत्व करा: जो स्वत:चे काम जाणतो, ते करण्याची क्षमता अंगी ठेवतो तो खरा लीडर. दुसर्‍याला आदेश देऊन काम करवून घेणं सोपं आहे पण ते काम योग्य पद्धतीने करवून घेणं अवघड आहे. यासाठी लीडर स्वत: उत्तम कामगार असला पाहिजे. त्याने स्वत: स्वत:चे नेतृत्त्व करून आपल्या कामाचा आदर्श इतरांसमोर ठेवावा. नेतृत्व आदर्शवादी असेल तर ते इतर कर्मचारी स्वीकारतात व काम सुधारते.
- कुठलंही काम हलकं समजू नका: काम छोटं असो वा मोठं ते हलकं समजू नका. छोट्या मोठ्या कामात लक्ष काय घालायचं ही प्रवृत्ती बदला. कारण यामुळे कामात अनेक मर्यादा पडतात. सहकार्र्‍यांच्या कामात लक्ष घाला. पण कुरबुर करू नका. वेळप्रसंगी मार्गदर्शन करा. पण त्यालाही त्याच्या पद्धतीने काम करण्याची मुभा द्या. सहकार्यांच्या कामाची दखल घ्या.
- नवनवीन योजना वापरा: बदलत्या परिस्थितीनुसार नवनवीन योजना अमलात आणा. यासाठी कर्मचार्‍यांना विश्‍वासात घ्या. कामाचं स्वरूप आणि त्यामुळे होणारे फायदे समजावून सांगा. यांत्रिकपणे काम करवून घेण्यापेक्षा ते नीट समजवून चांगलं काम करवून घेता आलं पाहिजे.
- खास बना: जगात पांढर्‍या व्यक्ती झपाट्याने कमी होत आहेत. त्यामुळे ते दिसताच त्याची बातमी होते. आपणही अशा प्रकारे सगळ्यांनी दखल घ्यावी इतकं ‘खास’ व्यक्तिमत्त्व बनवले पाहिजे.
- काम करायला शिका: घेतलेलं काम फक्त कागदावर लिहून चालत नाही ते प्रत्यक्षात उतरलं पाहिजे. ठरवलेल्या वेळेत चांगलं काम करून देतो तो लीडर.
- काम पूर्ण करा: घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी आधी ते सुरू केलं पाहिजे. यासाठी कामाचं उद्दिष्ट समोर ठेवा. त्याचा आलेख बनवा. कामे वाटून घ्या. ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व कामे दुय्यम आहेत असं समजून ते पूर्ण केले पाहिजे. जोपर्यंत वस्तू पूर्ण होत नाही तोपर्यंत ती कुणाच्याच उपयोगाची नसते. कामाचंही तसंच आहे. अपूर्ण कामाची कुणीच दखल घेत नाही.
- स्तुती करायला शिका: भविष्याचा विचार करून योजना आखा. चांगल्या कामाची दखल नेहमीच घेतली जाते. त्यानुसारच बढती, बोनस मिळतो. तुमच्या कामाची दखल कुणी घ्यावी असं वाटत असेल तर प्रथम तुम्ही तुमच्या सहकार्यांच्या कामाची दखल घ्यायला शिका. चांगल्या कामाची स्तुती करा.
- प्रशिक्षण घ्या: नेतत्व गुण हे उपजत असतात असं म्हणतात. पण आपल्यालाही ही संधी मिळावी म्हणून तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. यासाठी पुस्तक वाचन, प्रशिक्षण शिबीर, शिकवणी घेऊ शकता. हुशार व्यक्तीच्या सान्निध्यात राहून त्याची मदतही घेऊ शकता.


हेही लक्षात ठेवा:
- कुणी आपली मस्करी केली तर प्रति उत्तर देऊ नका.
- आपल्यावर कुणी मेहरबानी करावी अशी परिस्थिती निर्माण करू नका.
- स्वत:ला वेगळं समजू नका.
- कुठल्याही परिस्थितीत काम करण्याची तयारी ठेवा.
- आपलं कुणाला हसू करू देऊ नका.
- जबाबदारीचे भान ठेवा. बेफिकिरीतून बाहेर पडा.
- अपयश पचवण्याची ताकद ठेवा.
- दुसर्‍याच्या यशातही सहभागी व्हा.
- दुसर्‍याचं म्हणणं ऐका. त्यावर विचार करा.
- दुसर्‍या व्यक्तीच्या चुका काढण्यापेक्षा आपल्या चुका सुधारा.
- योग्य नियोजन करा.

हे टाळा:
* कधीही आपल्या वरिष्ठांसमोर हाताची किंवा पायाची घडी घालून बसू नका.
* बोलताना जास्त हातवारे करू नका. याने समोरच्याचं लक्ष विचलित होईल.
* सतत आपल्या चेहर्‍याला हात लावू नका. यामुळे इतरांना तुम्ही नर्व्हस असल्यासारखे दिसाल.
* बोलताना जास्त गंभीर राहू नका. याने लोकांचं तुमच्याकडे लक्ष जाणार नाही थोडं तरी हसत रहा. तसंच अगदी जोरजोरात खळखळून व सतत हसू नका.
* ऑफिसमध्ये असताना पाय हलवणे, टेबल वाजवणे असे प्रकार टाळा.
* कुठल्याही व्यक्तीच्या अगदी जवळ उभे राहू नका. व्यवस्थित अंतर ठेवून उभे रहा.